Maharashtra Desha
1 FOLLOWERS
Maharashtra Desha is a selfless news website. It is known for its extensive presence in the print and digital media sectors. They work with social consciousness. They emphasize writing news in a speech that readers can understand. They have an online news portal that provides news updates, articles, and other multimedia content.
Maharashtra Desha
13h ago
तळेगाव दाभाडे : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ काल (शुक्रवारी) तळेगाव दाभाडे शहरातून भव्य प्रचार फेरी काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तळेगाव शहरातून बारणे यांना किमान दहा हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही भाजपा नेते व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली.
बारणे यांच्या तळेगावातील प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद
खासदार बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ..read more
Maharashtra Desha
13h ago
चिंचवड: मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘महा रोड शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत बारणे यांच्या प्रचाराची मोठ्या धुमधडाक्यात सांगताही झाली.
मुख्यमंत्र्यांच्या ‘महा रोड शो’मध्ये खासदार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, चंद्रकांता सोनकांबळे, मयूर क ..read more
Maharashtra Desha
18h ago
बुलढाणा: दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणार्या भेंडवळ भविष्यावर राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्यांचेही लक्ष असते. त्या पार्श्वभूमीवर भेंडवळ भविष्यवाणीची घोषणा करण्यात आली. यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल. देशाचा राजा कायम राहील, अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान पीक-पाणी, राजकारण याचा वेध घेण्यासाठी बुलढाणा आणि आजुबाजूच्या गावातील मंडळींनी भेंडवळ भविष्यवाणी ऐकायला तोबा गर्दी केली होती.
पीक पाण्याचा अंदाज काय?
भेंडवळ भविष्यवाणी नुसार 2024 ..read more
Maharashtra Desha
18h ago
राज्यात 11 मतदार संघात तर, देशातल्या 10 राज्याचील 96 मतदार संघात मतदान होणार
मुंबई: लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे ला होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. राज्यात पहिल्या तीन टप्प्यातील मतदार पार पडले आहे. चौथ्या टप्प्यात एकूण 11 मतदार संघात मतदान होईल. तर देशातल्या 10 राज्याचील 96 मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. राज्यात रावसाहेब दानवे पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज मैदानात आहेत.
राज्यातल्या 11 लोकसभा मतदार संघात 13 ..read more
Maharashtra Desha
23h ago
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. माझे अजित पवार यांच्याशी मतभेद आहेत, असतीलही परंतु त्यांनी जातीपातीचे राजकारण केल्याचे मी कधी पाहिले नाही, असे राज म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीचा बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. सारसबागेसमोर त्यांची मोठी सभा पार पडली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर शुक्रवारी पुणे लोकसभेच ..read more
Maharashtra Desha
1d ago
पिंपरी : बारामतीची निवडणूक झाल्यानंतर वातावरण बदलल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार, उद्धव ठाकरे यांचा पक्ष चार जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरेंद्र मोंदीशिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही. काँग्रेस डुबती नाव आहे. देशासाठी काही करायचे असेल तर पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पवार, ठाकरेंनी खऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची भोसरीतील गावाजत्रा मैदानावर शुक्रवारी ( ..read more
Maharashtra Desha
2d ago
पिंपरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती; मात्र ‘आरटीई’च्या नियमामध्ये केलेल्या बदलांना स्थगिती देण्याचे न्यायालयाने आदेश दिल्याने ‘आरटीई’चे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पालकांना अर्ज करता येणार नाही.
तर नव्याने अर्जप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील आरटीई प्रवेशासाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली होती. त्यानुसार एक किमीच्या परिघात पालिकेची शाळा असेल तर त्याच शाळेत प्रवेश घ्यावा लागणार होता. त्यानुसार खासगी शाळांऐवजी प्राधान ..read more
Maharashtra Desha
2d ago
अहमदनगरः प्रचार करण्यासाठी ११ मे पर्यंत मुदत आहे. जाहीर प्रचारासाठी अवघे एकच दिवस उरलेला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी मतदारसंघातील गावोगावी जाऊन प्रचार केला. मतदारांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना सूचनाही केल्या आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करून रणनीती आखली. कुठून किती मिळेल, ही जुळवाजुळवही करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त असलेले गावोगावचे सरंपच, सदस्य, विकास सेवा सोसायटींचे चेअरमन, वजनदार पुढारी सक्रिय झाले आहेत. पण हे सगळे घडत असताना आता काही अनुचित प्रकार काही गावात घडताना दिसत आहेत.लोक अगदी खालच्या पातळीवर घसरून एकमेकांना भाषा वापरत आहेत ..read more
Maharashtra Desha
2d ago
शिरुर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांपैकी खासदार कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले, तर आमदारांपैकी शिरूरचे अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवारांची साथ देणे पसंत केले. असे असतानाही अजित पवार यांनी स्वपक्षातील शिलेदारांऐवजी शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. दांडगा जनसंपर्क, अनुभवी असलेल्या आढळराव यांनी डॉ. कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला. पाच वर्षांत कोल्हे मतदारसंघात फिरले नसल्याचे ठासून सांगितले. तर ..read more
Maharashtra Desha
2d ago
तळेगाव दाभाडे : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर मावळ लोकसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाला कायम ठेवली. त्यावेळी अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला व पुढील काही दिवसात त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुती मध्ये मात्र उमेदवारी वरून मोठी रस्सीखेच शेवटपर्यंत सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांनी या जागेवर दावा करत खासदार श्रीरंग बारणे हे म ..read more