Saamana
30 FOLLOWERS
Saamana is a Marathi-language newspaper published in Maharashtra, India, founded by Bal Thackare. Get the latest news, national, international, sports, weather, and more.
Saamana
41m ago
>> अॅड. संजय भाटे
ग्राहक संरक्षण कायद्याच्या ‘अनुचित व्यापारी प्रथा’ या संज्ञेत येणाऱया एका प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनुचित निर्णय देत प्रेक्षक ग्राहकांच्या न्याय्य हक्कासाठी व फसव्या जाहिरातीच्या अनुचित प्रथेविरुद्ध लढणाऱया पारदार अफरीनच्या लढय़ाच्या मुळावरच घाला घातला. ग्राहकाच्या वादात पारदार ग्राहकाला सेवा देणाऱया व्यक्ती वा संस्थेने दोषपूर्ण वा त्रुटीपूर्ण सेवा दिली वा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे सिद्ध करण्यासाठी आता ग्राहकालाच पाऊले उचलावी लागणार आहेत.
  ..read more
Saamana
41m ago
केंद्रातील मोदी आणि राज्यातील मिंधे सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड रोष आहे. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत असताना निवडणूक प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीची अतिभव्य सभा 17 ..read more
Saamana
41m ago
चिटर, लाचखोर म्हणणे म्हणजे पोलिसाची बदनामी करण्यासारखेच आहे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीविरोधातील प्रोसेस रद्द करण्यास नकार दिला.
माहिम येथील नरेश कन्हैयालाल राजवाणी यांच्याविरोधात पोलीस उप निरीक्षक मधुकर थावण यांनी बदनामीची खाजगी तक्रार कुर्ला महानगर दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याची दखल घेत कुर्ला न्यायालयाने राजवाणी याच्याविरोधात प्रोसेस जारी केले.
या प्रोसेसला राजवाणीने सत्र न्यायालयात अर्ज करुन आव्हान दिले. सत्र न्यायालयाने राजवाणीचा अर्ज फेटाळला. राजवाणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रोसेस रद्द करण्याची मागणी राजवाणीने केली. न्या. एन. आर. जमादार यांच्या ए ..read more
Saamana
41m ago
पंतप्रधान मोदी हे देशात हुकूमशाही आणू पाहतायत. त्यासाठी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम ते राबवत असून भाजपची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपमधीलही मोठे नेते राजकीय पटलावर दिसणार नाहीत. मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शहांसाठी मत मागतायत. दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीही बदलला जाईल, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला.
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर  ..read more
Saamana
41m ago
केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. विरोधात बोलणाऱयांना खोटय़ा केस टाकून तुरुंगात टाकले जाते. देश हुकूमशाहीच्या रस्त्याने चालला आहे. या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही, असे म्हणणाऱया इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, असा सवाल करत त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची हडपसर येथे सांगता सभा झाली, यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट ..read more
Saamana
41m ago
>> प्रा. अनिल कवठेकर
गेल्या अनेक वर्षांत हजारो चित्रपट आतापर्यंत पाहिले असतील. चित्रपटाच्या शेवटी पोलीस कशासाठी येतात हा विनोदाचा विषय होता, पण ‘लापता लेडीज’ हा चित्रपट त्याला अपवाद आहे. या चित्रपटाने पोलिसांची भूमिका सामाजिक समस्यांमध्ये कशी असावी हे अत्यंत मार्मिकपणे सूचित केले आहे. या चित्रपटाची अनेक सौंदर्यस्थळे सांगता येतील. हिंदी बहुभाषिक भागांमध्ये असलेला डोक्यावरचा पदर अर्थात घुंगट! हा घुंगट घेतल्यानंतर स्त्राrला फक्त पुरुषाचे पाय दिसतात आणि त्या स्त्राr ..read more
Saamana
41m ago
>> प्रसाद ताम्हनकर
जगभरातील अनेक सुरक्षा यंत्रणा या विविध गुन्ह्यांविरुद्ध लढत असताना त्यात आता `सायबर तस्करी’ या नव्या गुन्ह्याची भर पडली आहे. इंटरपोलसारखी तपास संस्थादेखील आता या नव्या गुन्हेगारीला सर्व जगाने गंभीरपणे घ्यावे असे आवाहन करताना दिसत आहे. इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानमधील काही लोकदेखील अशा तस्करीला बळी पडले आहेत. तिच्याशी लढण्यासाठी मोह टाळणे आणि भूलथापांपासून सावध राहणे, आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे असे महत्त्वाचे उपाय तातडीने अमलात आणणे गरजेचे.  ..read more
Saamana
2h ago
>> अस्मिता येंडे
लेखिका वसुंधरा घाणेकर यांचा ‘पांढरा गुलमोहर’ हा तिसरा कथासंग्रह असून जुन्या परंपरांसोबतच काळाशी सुसंगत असलेल्या परिवर्तनशील वैचारिक भूमिकेला स्वीकारणारा आहे. जुन्या रूढी, परंपरा रुजवल्या गेल्या, त्यामागील हेतू मानवी उत्कर्षाचा असेल, पण त्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगताना या परंपरांचे पारडे अधिकच जड होऊ लागले तर कुठेतरी मोकळा श्वास घेणे गरजेचे आहे, हीच वैचारिक मोकळीक, स्व-अस्तित्वाची जाणीव करून देणाऱया या कथा आहेत.
‘पांढरा गुलमोहर’ या कथासंग्रहात एकूण 9 ..read more