Nagar Chaufer
56 FOLLOWERS
Nagar Chaufer is a local Marathi-language daily publishing Maharashtra and Ahmednagar district's latest Political and Social developments, while also highlighting daily news bytes from Crime and Entertainment world. This website is updated in real time to reflect the latest news and changes happening across the state.
Nagar Chaufer
6h ago
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात एमआयएमतर्फे डॉक्टर परवेज अश्रफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वातावरण पाहता ही लढत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच मुख्यतः असल्याचे दिसत असून परवेज अश्रफी यांच्या उमेदवारीने मुस्लिम मतांचे विभाजन होऊन महाविकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची कुठलीच शक्यता आज तरी नाही.
मागील काही दिवसांपासून एमआयएमची भूमिका ही भाजपलाच पूरक राहिल्याचे अनेक निकालात समोर आलेले आहे तसेच अनेक निर्णयांमध्ये देखील समाजात हिंदू मुस्लिम वातावरण निर्मितीसाठी एमआयएमचा वापर होत असल्याचे दिसून आलेले आहे.आत्तापर्यंत तरी मतदार संघात मुस्लिम बांधवां ..read more
Nagar Chaufer
6h ago
केंद्र सरकारकडून एक सध्या गुजरातमधील दोन हजार टन कांद्यासाठी निर्यातबंदी उठवण्यात आली असून महाराष्ट्रातील कांद्यासाठी मात्र निर्यातबंदी कायम आहे. केंद्राने यापूर्वी कांदा निर्यात बंदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर कोसळले आणि शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले मात्र केंद्राला त्याचे काहीच सोयरसुतक राहिलेले नसून सत्ताधारी भाजपकडून नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिम , ट्रिपल तलाक , काश्मीर , पाकिस्तान अशी हरणे दाखवायला सुरु केली आहे . महागाई , बेरोजगारी , शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न याविषयी पंतप्रधान मोदी हे चकार शब्दही बोलायला तयार नाहीत आणि काँग्रेसच्या नावानेच गळे काढण्यात भाजपचे सर्व नेते सध् ..read more
Nagar Chaufer
7h ago
आपण कधीही राजकारणात येणार नाही असा निर्धार घेतलेल्या आरती हालदार यांनी अखेर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून 24 तारखेला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. वाल्मिकी विकास संघाच्या त्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असून बहुजन विकास संघाच्या त्या राष्ट्रीय सल्लागार आहेत. तब्बल 35 वर्षांपासून त्या समाजकारण करत असून राजकारणात कधीही येणार नाही असा निर्धार त्यांनी घेतलेला होता मात्र देशातील सद्य परिस्थिती पाहता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केलेला आहे.  ..read more
Nagar Chaufer
7h ago
राहुरी तालुक्यातील एका गावांमधून पंधरा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आलेले होते राहुरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अखेर या प्रकार प्रकरणातील पुण्यातील आरोपीला मंगळवारी अटक केलेली असून त्याच्या विरोधात अपहरणासोबत आता अत्याचाराचे देखील कलम वाढवण्यात आलेले आहे . मुलीला सुखरूपरीत्या तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.  ..read more
Nagar Chaufer
7h ago
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून गेल्या काही दिवसात पुण्यात रोज गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील एका हॉटेलमध्ये पैशाची मागणी केली मात्र पैसे दिले नाहीत म्हणून सराईत व्यक्तींनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना येरवडा परिसरातील अग्रसेन शाळा चौकात गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.  ..read more
Nagar Chaufer
7h ago
पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून समाजमाध्यमात झालेल्या ओळखीनंतर सराईत गुन्हेगारांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि विवाहाचे आमिष दाखवत तिच्याकडून 35000 आणि 81 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. विश्रामबाग पोलिसात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तन्मय नामदेव लोहकरे ( वय वर्ष राहणार खडकवासला ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची या अल्पवयीन मुलीसोबत ओळख झालेली होती. तन्मय याच्या विरोधात याआधीच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.  ..read more
Nagar Chaufer
7h ago
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून कर्जत तालुक्यातील एका तरुणाचा खून केला आणि जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात त्याचा मृतदेह पुरून टाकला प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यातील एक जण अद्याप फरार आहे तर दोघांना अटक करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तुषार शिवा काळे आणि गौरी तुषार काळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून नितीन काळे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. आरोपी तुषार व इतर आरोपी ( सर्वजण राहणार राजीव गांधी नगर कर्जत ) यांनी 18 तारखेला महेश नरगिशा काळे याचे अपहरण केलेले होते.  ..read more
Nagar Chaufer
7h ago
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडी कोठडीत असून मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणाचा ठपका ठेवत त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात डांबण्यात आलेले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामीन मिळावा म्हणून आंबे आणि मिठाई खात आहेत असा अजब दावा ईडीने न्यायालयात केलेला होता.
ईडीचा हा दावा फेटाळून लावत , ‘ तुरुंगात असताना 48 वेळा घरून जेवण आलेले होते आणि फक्त तीन वेळा आंबे खाल्ले आहेत ‘, असा दावा केजरीवाल यांच्यावतीने कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे.  ..read more
Nagar Chaufer
7h ago
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे एक धक्कादायक प्रकार समोर आलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव इथे वडील , काका आणि काकू यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून वडील ,काका , काकू यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  ..read more
Nagar Chaufer
23h ago
नगर जिल्ह्यात एक दुर्दैवी अशी घटना श्रीगोंदा तालुक्यात समोर आलेली असून येवती गावामध्ये कांदा झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाने घाला घातला आणि विज पडून शेतकऱ्याचा आणि त्यांच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कांदा भिजू नये म्हणून ते कांदा झाकण्यासाठी गेलेले होते.
नवनाथ बाजीराव आढाव ( वय 24 वर्ष ) आणि त्यांची आई मिनाबाई बाजीराव आढाव ( वय 50 वर्ष दोघेही राहणार येवती ) अशी मयत मायलेकाची नावे असून शेतातील कांदा भिजू नये म्हणून कांदा झाकण्यासाठी ते घरातून बाहेर पडलेले होते. अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि आई आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाला.
The post ..read more