Tarun Bharat
82 FOLLOWERS
Tarun Bharat is an online newspaper published mainly in the Marathi language but is also available in other languages. Stay updated on National, and international issues, sports, entertainment, and more.
Tarun Bharat
6h ago
निवडणूकीसाठी 136 उमेदवारी अर्ज दाखल : 30 व 31 मार्चला अर्ज माघार; निवडणूक बिनविरोध होणार
कोल्हापूर प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची निवडणूक 7 एप्रिला रोजी होणार आहे. गुरूवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 136 उमेदवारी अर्ज भरले आहेत. असे असले तरी आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडणूकीचा निर्णय झाला आहे. 23 जागांपैकी माजी सचिव दत्ता पाटील गटाला 12 तर माजी चेअरमन सुरेश संकपाळ गटाला 11 ..read more
Tarun Bharat
6h ago
आपण हातकणंगलेची जागा लढवण्यास इच्छुक नसून कोल्हापूरच्या जागेवरच ठाम असल्याची घोषणा डॉ. चेतन नरके यांनी केली आहे. मी गेली तीन चार वर्षे कोल्हापूर लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असून हातकणंगले मतदारसंघ आपल्यासाठी सोयीचा नसल्याचंही ते म्हणाले.
गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यासाची तयारी करत असलेल्या डॉ. नरके यांनी तशा प्रकारची मोर्चेंबांधणी करताना मतदारसंघामध्ये प्रचार राबवला होता. पण आता बदलत्या राजकिय घडामोडीमध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्याने त्यांच्यासाठी राजकिय पेच निर्माण झाला होता.
पहा VIDEO>>> ..read more
Tarun Bharat
7h ago
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले की, सरकार टोल बंद करत असून लवकरच नवीन उपग्रह आधारित टोल वसुली प्रणाली सुरू केली जाईल. “आता आम्ही टोल संपवत आहोत आणि एक सॅटेलाइट बेस टोल कलेक्शन सिस्टीम असेल. तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि त्यानुसार तुम्ही जितका रस्ता कव्हर केला जाईल तितके पैसे आकारले जातील. याद्वारे वेळ आणि पैसा वाचवता येईल. पूर्वी ते वापरत होते. मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी 9 तास लागायचे, आता ते 2 तासांवर आणले आहे,” नितीन गडकरी यांनी एएनआयला सांगितले. सुमारे 26,000 ..read more
Tarun Bharat
8h ago
डेहराडून/रुद्रपूर : उत्तराखंडमधील नानकमत्ता साहिब गुरुद्वाराच्या डेरा प्रमुखाची गुरुवारी पहाटे दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी मंदिराच्या आवारात गोळ्या घालून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. बाबा तरसेम सिंग यांना तातडीने खातिमा येथील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे उधम सिंग नगरचे एसएसपी मंजू नाथ यांनी पत्रकारांना सांगितले. नानकमत्ता साहिब गुरुद्वारा हे राज्याच्या उधम सिंग नगर जिल्ह्यातील रुद्रपूर-टनकपूर मार्गावर स्थित एक आदरणीय शीख मंदिर आहे ..read more
Tarun Bharat
11h ago
पालेकर, रामराव, दत्तप्रसाद, अशोक नाईक यांना समन्स : चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याचा ईडीचा आदेश
पणजी : अरविंद केजरीवाल यांच्या मद्य घोटाळ्याचे गोवा कनेक्शन असल्याचा संशय बळावल्यानंतर राज्यातील अनेकांचे धाबे दणाणले होते. दिल्लीतील मद्य घोटाळ्यातून मिळालेल्या रक्कमेचा काही भाग गेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तब्बल 45 ..read more
Tarun Bharat
11h ago
पंचायत संचालनालयाचा आदेश : कथित सोळा लाखांचा घोटाळा
पणजी : पंचायत निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी सांगोल्डा पंचायतीचे उपसरपंच उल्हास मोरजकर यांना पंचायत संचालनालयाने अपात्र ठरविले असून पुढील दोन वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. या आदेशामुळे त्यांचे उपसरपंचपद गेले असून पंचसदस्यपदही त्यांना गमवावे लागले आहे. पंचायत संचालनालयाने तसा आदेश जारी केला आहे. या प्रकरणी मिळालेल्या महितीनुसार, त्यांनी पंचायत निधीमधील सुमारे रु. 16 ..read more
Tarun Bharat
11h ago
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक ठरले आहेत. भाजपने एकूण 23 नेत्यांची यादी महाराष्ट्राकरीता जाहीर केली असून त्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव 7 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अशोक चव्हाण यांचे नाव सर्वात शेवटी म्हणजेच 23 क्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. न•ा, राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, डॉ. प्रमोद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. गोव्यात दि. 7 ..read more
Tarun Bharat
11h ago
पणजी : अनियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे पणजी शहरातील वाहतूक व्यवस्था, रस्ता सुरक्षा आणि धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आखलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षरित्या पाहणी करण्यासाठी येत्या 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. महेश सोनक पणजीत येणार असल्याचे  ..read more
Tarun Bharat
11h ago
वाढलेल्या भाज्यांच्या दरामुळे नागरिक त्रस्त : आल्याच्या दरात वाढ, लसूण मात्र स्थिर
पणजी : पणजी बाजारपेठेत मिरची, वालपापडी, मटार व ढबूने शतक गाठले असून, 100 ऊपये प्रतिकिलो दराने या भाज्या विकल्या जात आहेत. राज्यात उष्मा वाढत असल्याने याचा फटका या भाज्यांच्या दरावर जाणवत आहे. भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. गेल्या आठवड्याप्रमाणे लसूणाचे दर पणजी बाजारपेठेत स्थिर असून 200 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. गेल्या आठवड्यात आले 160 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. त्यात 40 ऊपयांनी वाढ झाली आसून 200 ..read more