विवेक पटाईत
113 FOLLOWERS
This blog is run by Vivek Patait. He finds himself to be a sensitive mind that is passionate about writing and reading. His favorite movie is Do Aankh Barah Haath and his favorite genre is comedy.
विवेक पटाईत
1w ago
दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. सवयी प्रमाणे माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. चिरंजीवांना माझ्या खाद्य प्रयोगांची भीती वाटते. तो सदैव सौ.ची अर्थात आईंची घेतो. पण आज सोन्याचा दिवस उगवला वरक् फ्रॉम होम असले तरी चिरंजीव आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला जातात. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 ..read more
विवेक पटाईत
1w ago
जय जय रघुवीर समर्थ
आज श्रीमद् दासबोधातील बद्ध निरूपण समासाचे निरूपण करण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्पबुध्दीने करत आहे. समर्थ म्हणतात सृष्टीत अनंत जीव आहेत तथापि त्यांचे चारच वर्ग आहेत. बद्ध,  ..read more
विवेक पटाईत
2w ago
( लेख लिहताना कुणाचीही अवमानना होणार नाही याची काळजी घेतली आहे.)
पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते हे विधान कायद्याला धरून नाही. जनतेला चुकीची माहिती देणे हा गुन्हा आहे. 'मी खगोल यंत्रांच्या मदतीने सिद्ध केले आहे की पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते', गॅलिलिओने उत्तर दिले. आम्ही इथे पुस्तकातील लिखित कायद्यानुसार निर्णय देण्यासाठी आहोत. चुकीच्या माहिती बाबत आधी माफी माग अन्यथा आम्ही तुला कठोर दंड देऊ. गॅलिलिओ ने माफी मागितली. न्यायाधीशाने त्याची माफी स्वीकार केली नाही. त्याला कारावासात टाकले. ही झाली 16 व्या शतकातील घटना.
रामदेव तुम्ही1954 ..read more
विवेक पटाईत
2M ago
जय जय रघुवीर समर्थ
गजेंद्रू महासंकटि वाट पाहे
तया कारणे श्रीहरी धांवता आहे.
उडी घातली जाहला जीवदानी
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी.(११८)
समर्थ म्हणतात, एकदा महा बलशाली गजेंद्र एका सरोवरात आपल्या परिवारासंगे जल क्रीडा करत होता. अचानक एका मगराने त्याचे पाय धरले आणि त्याला पाण्यात ओढू लागला. गजेंद्र जमिनीवर भल्या मोठ्या वृक्षांना सोंडेने उपटून टाकू शकत होता. सिंहलाही आपल्या पायदळी तुडवू शकत होता. पण पाण्यात या शक्तींचा काही एक उपयोग नव्हता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गजेंद्रने भगवंताचे स्मरण केले आणि मदतीची याचना केली. गजेन्द्रची आर्त हाक ऐकून भगवंत धावत गेले आणि  ..read more
विवेक पटाईत
2M ago
अहल्या शिळा राघवे मुक्त केली
पदी लागतां दिव्य होऊनी गेली.
जया वर्णिता सिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी.
समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ  ..read more
विवेक पटाईत
4M ago
( काही सत्य काही कल्पना)
रात्रीचे स्वप्न:
११वी बोर्डाचा रिझल्ट लागला आणि तो पाहण्यासाठी मी शाळेत गेलो. निशा शर्मा नितीनच्या कारला टेकून उभी होती. पंजाबी असली तरी मराठमोळ्या मुली सारखी सडपातळ, सुबक ठेंगणी होती. तिचे मोठे पाणीदार डोळ्यांनी कुणालाही घायाळ करण्यास समर्थ होते. वर्गातील सर्वच मुले तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे. पण ती कुणालाही दाद द्यायची नाही. माझे लक्ष कधीच तिच्याकडे गेले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रेम-बिन सारखे विचार कधीच मनात आले नाही. मला पाहताच तिने हाय केले. मीही तिला "हाय  ..read more
विवेक पटाईत
4M ago
स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, ईच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही. स्वामीजी धर्मदेव कडे पहात  ..read more
विवेक पटाईत
5M ago
श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एका जिवलग मित्राने या श्लोकाची टिंगल करत टिप्पणी केली. तो म्हणाला तुम्ही मनुवादी लोक नेहमीच श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो उगाच विपर्यास करू नको, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर  ..read more
विवेक पटाईत
5M ago
आपण ढाब्यात जेवतो.आपल्याला वाटते सर्व नफा हा ढाब्यावाल्याचा. पण त्या नफ्यात ही ही अनेक वाटेकरू असतात. ढाबेवाला खाण्या - पिण्याची सामग्री ज्या कंपन्यांकडून घेतो, त्यांच्या वाटा ही असतो. त्याच अनुषंगाने देशातील एका महान नेत्याने, एका भाषणात म्हटले, जेव्हा लोक ढाब्यात शंभर रुपये खर्च करतात तेव्हा दहा ते पंधरा रुपये देशातील एका उद्योगपतीच्या खिश्यात जातात. त्या महान नेत्याच्या वक्तव्यात कितपत सत्य आहे. हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला.
आधी पिण्याचे पदार्थ. चहाचे दोन मोठे ब्रँड brook bond आणि लिफ्टन हे विदेशी कंपनी युनिलिव्हर पेप्सिकोचे आहेत. देशात  ..read more
विवेक पटाईत
6M ago
फार पूर्वी एक गोष्ट वाचली होती. लेखकाचे नाव लक्षात नाही. पण गोष्ट अशी होती, एकदा वन विभागाच्या खर्चाची बचत करण्यासाठी वन खात्याचे मंत्री जंगलाच्या दौऱ्यावर आले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था वन खात्याच्या गेस्ट हाऊस मध्ये गेली. मंत्री महोदयांना जंगल फिरविण्यासाठी एक हत्ती आणला. अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना पटवून दिले की हत्ती खात्याच्या कामांसाठी किती गरजेचा आहे. मंत्री महोदयांनी हत्ती, माहूत आणि हत्तीच्या चाऱ्यासाठी मोठे बजेट मंजूर केले. रात्री जेवल्यानंतर मंत्री महोदय शतपावली करत होते, त्यांना एक कर्मचारी एका वाटीत दूध घेऊन जाताना दिसला.  ..read more